मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एड.रमेश एस.उमरगे (अण्णा) समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानून केवळ आदर्श विचारच नव्हे तर त्या विचारावर प्रत्यक्ष चालणारं व प्रचंड सकारात्मक उर्जा लाभलेलं एक आदर्श व्यक्तीमत्त्वं!

एड.रमेश एस.उमरगे (अण्णा) समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानून केवळ आदर्श विचारच नव्हे तर त्या विचारावर प्रत्यक्ष चालणारं व प्रचंड सकारात्मक उर्जा लाभलेलं एक आदर्श व्यक्तीमत्त्वं! "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित. तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे". या महान कवितेतील उक्तीप्रमाणे आपल्या जीवनाची नौका चालवणारं एक आदर्श व्यक्तीमत्त्वं म्हणजे 'एड.रमेश एस. उमरगे' (अण्णा).  ही कविता आम्हाला आमच्या बालपणी शालेय जीवनात शिक्षकांनी शिकवली होती. तेव्हा कवितेचा अर्थ, मतितार्थ कळाला नाही. परंतु जसे जसे वय वाढत जाऊन माणसाच्या बौद्धिक क्षमतेत वृद्धी होते. तसे त्यांना लहानपणी त्याच्यावरील झालेल्या संस्काराचा, चांगल्या गोष्टीचा अर्थ कळू लागतो. हा अर्थ कळण्यासाठी माणसाच्या केवळ वयातच वृद्धी व्हावी लागते असे नाही तर त्याला जीवन जगत असताना बरे वाईट अनुभवही यावे लागतात. तेव्हा कुठे अशा कवितांचा खरा अर्थ असो किंवा एखाद्या महान संतांच्या उक्तींचा, कवनांचा, शास्त्रातील सिद्धांताचा, महापुरूषांच्या विचारांचा खरा अर्थ कळतो. त्यानंतरच मग प्रत्येक माणसांची जगाकड...

जाणून घ्या! बदनामी (Defamation) किंवा बेअब्रू म्हणजे नेमकं काय? भारतीय दंड संहिता या कायद्यानुसार या गुन्ह्याची व्याख्या!

बदनामी किंवा अब्रूनुकसान म्हणजे नेमके काय? आपण आज सर्वत्र पाहतो की,सध्याचे सामाजिक वातावरण फार बिघडत चाललं आहे. सामाजिक स्वास्थ्यासाठी ज्या काही अपायकारक गोष्टी आहेत त्या गोष्टीचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. विविध सामाजिक मुल्य, आदर्श, धार्मिक, सामाजिक वातावरण यात फार मोठ्या प्रमाणात तफावत आलेली आहे. व्यक्तींच्या जगण्यात खूप मोठा बदल झालेला आज दिसून येत आहे. या सदरील बदलामुळे व्यक्ती व्यक्तीमध्ये दुरावा, गैरसमज, त्वेष,असुरक्षिततेची भावना फार मोठ्या प्रमाणात वाढतेय. यावर राग किंवा बदला घेण्याची जी वृत्ती आहे त्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणून काही लोक वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करताना दिसत आहेत. त्यापैकीच एक मार्ग म्हणजे खुनशी भावनेने वेगवेगळ्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची बदनामी करणे हा एक प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढतोय. त्यात भर म्हणून सध्या सोशल मीडियावर बदनामी करण्याचं प्रमाणही फार वाढलेलं आहे. या सर्व बेकायदेशीर गोष्टीना भारतीय दंड संहितेचं कलम-४९९ मध्ये फार विस्तारितपणे सांगितलं आहे. अतिशय सटीक अशी व्याख्या या कलमामध्ये केलेली आहे. " जो कोणी व...