मुख्य सामग्रीवर वगळा

जाणून घ्या! बदनामी (Defamation) किंवा बेअब्रू म्हणजे नेमकं काय? भारतीय दंड संहिता या कायद्यानुसार या गुन्ह्याची व्याख्या!

बदनामी किंवा अब्रूनुकसान म्हणजे नेमके काय?

आपण आज सर्वत्र पाहतो की,सध्याचे सामाजिक वातावरण फार बिघडत चाललं आहे. सामाजिक स्वास्थ्यासाठी ज्या काही अपायकारक गोष्टी आहेत त्या गोष्टीचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. विविध सामाजिक मुल्य, आदर्श, धार्मिक, सामाजिक वातावरण यात फार मोठ्या प्रमाणात तफावत आलेली आहे. व्यक्तींच्या जगण्यात खूप मोठा बदल झालेला आज दिसून येत आहे. या सदरील बदलामुळे व्यक्ती व्यक्तीमध्ये दुरावा, गैरसमज, त्वेष,असुरक्षिततेची भावना फार मोठ्या प्रमाणात वाढतेय. यावर राग किंवा बदला घेण्याची जी वृत्ती आहे त्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणून काही लोक वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करताना दिसत आहेत. त्यापैकीच एक मार्ग म्हणजे खुनशी भावनेने वेगवेगळ्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची बदनामी करणे हा एक प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढतोय. त्यात भर म्हणून सध्या सोशल मीडियावर बदनामी करण्याचं प्रमाणही फार वाढलेलं आहे. या सर्व बेकायदेशीर गोष्टीना भारतीय दंड संहितेचं कलम-४९९ मध्ये फार विस्तारितपणे सांगितलं आहे. अतिशय सटीक अशी व्याख्या या कलमामध्ये केलेली आहे.

" जो कोणी व्यक्ती बोललेल्या किंवा अशी शब्द जी एखाद्याकडून वाचले जावेत अशा बदनामीकारक शब्दांनी किंवा खुणांनी किंवा एखादे दृश्य किंवा एखादे असे निवेदन की ज्यामुळे त्या पुढील व्यक्तीस हानी पोहचेल, किंवा एखादा असा आरोप ज्यामुळे पुढील व्यक्तीच्या मानसन्मानाला इजा पोहचेल ही गोष्ट माहित असताना एखाद्या व्यक्तीची बदनामी करणे म्हणजेच "अब्रूनुकसान" होय.

ही व्याख्या समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. कारण बदनामी होईल असं कोणतेही कृत्य या व्याख्येत बसणे फार महत्त्वाचे आहे. म्हणून व्याख्येला फार महत्त्व असते. आपल्या भारतीय कायद्यानुसार हा जो बदनामीचा गुन्हा आहे तो शाबीत होण्यासाठी काही मुलभूत घटक आहेत ती तीन प्रकारची आहेत.

१.म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्याच्याशी संबंधित एखादा बदनामीकारक आरोप करणे किंवा तोच आरोप प्रसिद्ध करणे.

२. असा आरोप जो बोललेल्या किंवा लिखीत स्वरूपात किंवा खुणांनी किंवा एखादे दृश्य निवेदनाने केलेला आरोप.

. तसेच असा आरोप ज्या आरोपामुळे आपल्याला हे माहिती आहे की आपल्या आरोपामुळे पुढील व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहचू शकते असा आरोप. ही तीन कारणे अत्यंत महत्त्वाची आहेत. याशिवाय बदनामीचा गुन्हा झाला असे म्हणता येणार नाही.

तसेच या गुन्ह्यात गुन्हा करणारी मुख्य व्यक्ती तसेच त्यास साथ देणारी व्यक्ती संयुक्तपणे जबाबदार असते.मग ती साथ किंवा सहकार्य कोणत्याही मार्गाने असो.ही एक महत्त्वाची बाब आहे.काहीजण विविध माध्यमांचा यासाठी आधार घेतात.जसे वर्तमानपत्रातून एखाद्या व्यक्तीची बदनामी करणे,त्यावर बदनामी होईल असे आरोप करणे.अशा गोष्टीचाही आधार घेतला जातो.काहीजण एखाद्या व्यक्ती विरुद्ध एखादा बदनामी कारक मजकूर लिहून तो बंद लिफाफा किंवा वैयक्तिक भेटून तो मजकूर देतात. तर अशा प्रकरणात तो बदनामीचा गुन्हा होत नाही. कारण बदनामी होण्यासाठी तो लिहलेला मजकुर आहे तो सार्वजनिक व्हायला हवा तरच त्याची बदनामी झाली असे मानण्यात येते अन्यथा नाही. 

ही आहे या गुन्ह्याची थोडक्यात तोंडओळख.तसेच यात अनेक प्रकार आहेत. त्यास वेगवेगळ्या शिक्षा आहेत. तसेच काही महत्त्वाचे अपवादही आहेत.जे आपण पुढील लेखात सविस्तरपणे पाहू.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. मो.9309770054

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या अट्रोसिटी कायदा व त्या संबंधित सम्पूर्ण आवश्यक माहिती जी प्रत्येक अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला माहिती असायलाच पाहिजे.

अट्रोसिटी ऍक्ट अट्रोसिटी  कायद्याला मराठीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा,1989 असे म्हणतात. संयुक्त राष्ट्र संघाचा मानवी हक्क जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आणि भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास चाळीस वर्षे लोटल्यानंतर भारतातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी हा कायदा करावा लागला.हा कायदा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या रक्षणासाठी तयार केला गेला आहे ही गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे.परंतु हे रक्षण नेमके कोणापासून व का हा फार मोठा प्रश्न उपस्थित होतो.हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्याचं उत्तर देताना भारताच्या पुर्वइतिहासात जाऊनच आपल्याला पाहावं लागेल तोपर्यत त्याचा व्यवस्थित उलगडा होणार नाही. भारतामध्ये हजारो वर्षापासून इथल्या उच्चवर्णीय लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी इथे हजारो प्रकारच्या जाती निर्माण केला आहेत व आपली वर्चस्ववादी व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे.म्हणून यामध्ये जातीचा विचार करत असताना वर्णाचा विचार सुद्धा करावा लागेल.कारण या सर्व जाती या वर्णातुनच आलेल्या आहेत. भारतातील वर्णव्यवस्था...

डॉ. बबन जोगदंड-माणसातील अधिकारी व अधिकाऱ्यातील माणूस एक प्रचंड सकारात्मक उर्जा असलेलं आदर्श व्यक्तीमत्व!-अँड.के.टी.चावरे (उच्च न्यायालय मुंबई)

व्यक्तीपरिचय: डॉ.बबन जोगदंड हे महाराष्ट्र शासनाच्या ' यशदा ' या शिखर प्रशिक्षण संस्थेमध्ये गेल्या 16 वर्षांपासून संशोधन अधिकारी या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत.या संस्थेमध्ये ते स्वतः वर्ग-1 च्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेतात.त्याचबरोबर ते स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनाही नियमित मार्गदर्शन करत असतात.त्यांनी गेल्या सहा वर्षापूर्वी पुण्यामध्ये स्वयंदीप करियर अकॅडमी ही गरीब व होतकरू मुलांसाठी स्पर्धा परीक्षेची अत्यंत दर्जेदार अकॅडमी सुरू केली आहे.आतापर्यंत येथून अनेक विद्यार्थी घडले आहेत व बरेच जण अधिकारी पदावर पोहचले आहेत.जोगदंड सरांचे स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात वेगवेगळे वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके यामध्ये सातत्याने लेख प्रसिद्ध होत असतात.विशेषत: शासनाच्या ' लोकराज्य' या लोकप्रिय मासिकात सुद्धा ते सातत्याने स्पर्धा परीक्षेसंदर्भात लिखाण करत असतात.त्यांनी आतापर्यंत 20 विषयात पदव्या संपादन केलेल्या असून पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात पी.एच.डी ही सर्वोच्च पदवी प्राप्त केलेली आहे. अत्यंत बिकट व प्रतिकूल परि...

भारतीय महीलांचे कायदेविषयक हक्क,अधिकार व कर्तव्य. प्रत्येक भारतीय स्त्रीने जाणून घ्यायलाच हवे असे कायद्याचे अतिशय उपयुक्त ज्ञान.

भारतीय महिलांचे हक्क,अधिकार व जबाबदारी:भाग-१ मित्रांनो,आज आपण आपल्या भारतीय स्त्रियांचे आपल्या कायद्यातील हक्क व अधिकार जाणून घेणार आहोत.आजची पोस्ट लिहण्यामागचा जो उद्देश आहे तो आपल्या भारतीय महिलांना आपले हक्क व अधिकार काय आहेत हे माहिती असावे व महिलांना कायदा साक्षर करणे हा एकमेव उद्देश आहे.आज बहुतांश महीलांना त्यांच्यासाठीच असलेल्या आरक्षणातील तरतुदी माहिती नाहीत.कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा व त्यावरील  उपाय काय या गोष्टी माहिती नाहीत.तसेच आज जवळपास बहुतांश महिला या आपल्या खाजगी व सरकारी कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाहीत त्यांचे प्रचंड लैंगिक शोषण केल्या जाते तरीही आपल्या महिला तशाप्रकारचे लैंगिक शोषण निमुटपणे सहन करत असतात.पण बहुतांश महीलांना त्यावर प्रतिबंधात्मक उपाय आणि कायदे आहेत हे माहित नाहीत आणि ज्या महीलांना याबद्दल माहिती असते अशा महिला पोलिसात तक्रार द्यायला भीत असतात.आज महीलांंसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आहे,विधी सेवा प्राधिकरण आहे इत्यादी बरीच मदत केंद्रे आहेत पण आपली भारतीय स्त्री ही कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे स्वतावरिल झालेल्या अत्याचारालाही वाचा...