समान नागरी कायदा (UNIFORM CIVIL CODE) म्हणजे नक्की काय ? ।। समान नागरी कायद्याने खरंच आरक्षण रद्द होणार का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखातून ! आज आपण पाहणार आहोत समान नागरी कायदा या विषयीची माहिती. समान नागरी कायदा हा शब्द आपण अनेक ठिकाणी ऐकत असतो, वापरत असतो, आज पाहणार आहोत नेमकं समान नागरी कायदा म्हणजे काय आहे ? समान नागरी कायदा हा शब्द आपल्या पैकी सर्वजण खूप वेळा ऐकत असतात. अनेक जण समान नागरी कायदा लागू व्हावा म्हणून आग्रही असतात. तरीहि अनेकांना समान नागरी कायदा म्हणजे काय ? आणि तो लागू झाल्यास काय बदल होतो ? याची कल्पनाच नसते. तरीही अनेकजण त्याची मागणी करतात. त्यासाठी राजकीय कारणे असतात. अनेकांना असं वाटतंय की, समान नागरी कायदा ने हिंदू आणि मुसलमान यांना एकच न्याय प्रणाली लागू होईल. तर अनेकांना असं वाटतं की आरक्षण जाऊन सर्वांना समान संधी मिळते. पण यात खूप मोठी तफावत आणि गैरसमज आहे. समान नागरी कायदा हा यापेक्षा वेगळा आहे आणि तो इतका गुंतागुंतीचा होत आहे. आज आपण हेच जाणून घेणार आहोत समान नागरी कायदा म्हणजे काय? :भारतात लागू असलेल्या कायद्यानुसार जर त्याची विभागण...
भारताच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात मोठी केस (प्रकरण) केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य! महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाला मानणाऱ्या प्रत्येकांनी ही केस वाचावी!
मित्रांनो आज आपण भारताच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात महत्त्वाची केस म्हणजेच केशवानंद भारती ही केस जाणून घेणार आहोत व त्यासोबतच आपल्या भारतीय संविधानाची मुळ चौकट ( Basic Structure ) समजून घेणार आहोत. केशवानंद भारती ही केस आपल्यापैकी बहुतांश जणांना माहिती असेल किंवा असं सुद्धा होऊ शकते की काही कारणांमुळे माहिती नसेलही.कारण आपल्या देशात कायद्याच्या बाबतीत म्हणावी तशी विशेष जनजागृती होत नाही.आपला कायदा हा अतिशय सुंदर व सर्वोच्च आहे परंतु त्याबद्दलची जागृती होताना दिसत नाही. भारतीय संविधान हे जगात श्रेष्ठ आहे ही गोष्ट सर्व जग मानते.एवढं सुंदर व परिपूर्ण संविधान जगात कुठेही नाही.परंतु हे संविधान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचं कार्य होताना दिसत नाही.संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम आतापर्यंत कोणत्याही सरकारने केलेले नाही.वस्तुतः ही सरकारचीच मुख्य व प्राथमिक जबाबदारी आहे. आज भारतामध्ये अनेक विद्यापीठे व त्याअंतर्गत येणारे हजारो सरकारी,खाजगी महाविद्यालये,शाळा,संस्था आहेत ज्यामध्ये ते भारतीय संविधानाचं,राज्यशास्त्राचं,नागरिक शास्त्राचं शिक्षण...